व्ही शांताराम
ISBN: 978-81-970053-9-8
लेखक : गिरीश घाटे
मूल्य : रु. ३०० (कुरियरचा खर्च समाविष्ट - केवळ भारतात)
भारतीय चित्रसृष्टीच्या विकासात महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर यांनी सुरू केलेले हे कार्य समर्थपणे पुढे नेणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये ‘व्ही शांताराम’ यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून समाजप्रबोधन साधणे हीदेखील आपली नैतिक जबाबदारी आहे’ हा विचार शांतारामांनी चित्रसृष्टीला दिला. ‘अद्ययावत तंत्रांचा उपयोग’ आणि ‘आपली प्रतीकात्मक दिग्दर्शन शैली’ याने व्ही शांताराम यांनी भारतीय चित्रसृष्टीवर आपला ठसा उमटवला. चित्रसृष्टीतील आपल्या कारकिर्दीत त्यांनी ७० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली, ४४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले, तर २१ चित्रपटांत अभिनय केला.
एस. एम. जोशी
ISBN: 978-81-970053-5-0
लेखक : गिरीश घाटे
मूल्य : रु. ३०० (कुरियरचा खर्च समाविष्ट - केवळ भारतात)
‘संयुक्त महाराष्ट्रा’च्या निर्मितीत काही महत्वाच्या नेत्यांचा सहभाग होता, त्यात एसएम जोशी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी घोषित करण्यात आली. परंतु यासाठी मराठी जनतेने उभारलेला लढा मराठी माणूस विसरू शकणार नाही. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’चे सरचिटणीस या नात्याने एसएम जोशी यांनी लढ्याचे प्रभावी नेतृत्व केले आणि केंद्रीय नेत्यांना संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. १९७५ ते १९७७ या काळात देशाला आणीबाणीच्या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जावे लागले. आणीबाणी उठल्यानंतर विरोधी पक्षांनी ‘जनता पक्षाची’ची स्थापना करून देशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचा कौतुकास्पद प्रयोग केला. जनता पक्षाच्या निर्मितीत जयप्रकाश नारायण यांचे निकटचे सहकारी या नात्याने एसएम जोशी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
स्वामी रामानंद तीर्थ
ISBN: 978-81-970053-3-6
लेखक : गिरीश घाटे
मूल्य : रु. ३०० (कुरियरचा खर्च समाविष्ट - केवळ भारतात)
मराठवाड्याचा इतिहास जाणणाऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. निजामाच्या सरंजामशाही राजवटीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले. त्यानंतर राज्याचे त्रिभाजन होऊन तेलगू भाषिक भूभाग आंध्र प्रदेशात, कानडी भाषिक प्रांत कर्नाटकात आणि मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राज्याच्या त्रिभाजनात अग्रगण्य नेते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे.
पुस्तक खरेदीसाठी बाजूला दिलेल्या QR कोड वर पेमेंट करा. आपले नाव, पेमेंटची पावती, पुस्तकाचे नाव, कुरियर साठी पत्ता व्हाट्सअपने कळवा.